स्त्री जगातली अर्धी शक्ती आहे. निसर्गतः अनेक क्षमता तिच्यात आहे. स्त्री म्हणजे स्रुजन, स्त्री म्हणजे नवनिर्मिती,स्त्री म्हणजे शक्तीचा अमर्याद स्त्रोत! प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर होण्यासाठी वाटचाल करण्याची खरी गरज आहे. भारत सरकारनेही आता स्त्री सशक्तीकरणासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. स्त्रीयांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, आपल्या पंखात बळ आणावे, प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्यात, असा आमचाही मानसआहे. त्यादृष्टीने 'महाचहा' हे त्यांना उपलब्ध करून दिलेले नवे आकाश आहे. यात त्यांनी उत्तुंग भरारीची झेप घ्यावी, कर्तृत्वाच्या पताका फडकवाव्यात, त्यांच्या क्षमतांना आकार द्यावा, एक नवा भारत घडविण्यास सुसज्ज व्हावे, प्रगतीचे शिलेदार त्यांनी व्हावे, हीच आमची मनीमानसी इच्छा आहे.
महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून महिलांना चालवण्यास महा चहाचे विशेष आउटलेट दिले जाईल. फ्रेंचायसी धारक होण्यापासून त्यात कार्यरत इतर कर्मचारीही महिलाच असतील. पाककलेत निपुण असणाऱ्या हातांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधीही त्यामुळे मिळेल. स्त्रियांनी आत्मनिर्भर होऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी महाचहा हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे.